२.सुशांत सिंह आत्महत्या.. आणि आपण सगळेच..

  प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो की माणसाला वाटतं की

      आपण का जगतोय ?
       कोणासाठी जिवन जगतोय ?
जेव्हा या दोन प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नाही , तेव्हा तो निराश होतो आणि आत्महत्या हा घातक विचार त्याच्या मनात येतो.
असं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी घडलेले असतं.
मग काय करावं ?
१. बोलते व्ह्या. स्वतः च्या मनातील खदखद बाहेर येऊ द्या

२. लिहा.बोलता येत नसल्यास लिहून काढा.

३. भारतातील मदत केंद्र ०२२ २७५४ ६६६९
   यावर कॉल करा.
हे झालं असा विचार आल्यावर काय करावं यासाठी.

पण अशी वेळच येऊ नये यासाठी काय करावं ?

१. आपल्या आवडी,  छंद जोपासा.
२. सकारात्मक विचारांवरची पुस्तके वाचा.
    (नावे पाहिजे असल्यास मला मेसेज करा )
   सकारात्मक विचारांच्या मित्रांसोबत रहा.
३. जिवनात पैशाचे मागे न लागता,
     जिवन समाधानाने आनंदात कस जगता येईल        याचा विचार करा.
४. स्वतः वर प्रेम करा. कोणाकडूनही कुठलीच अपेक्षा ठेऊ नका.
फक्त स्वतः वर विश्वास ठेवा.
५. दररोज किमान १० मिनिटे ध्यान, mediation,
ओम चा जप करा.
६. दररोज अर्धा तास तरी आपल्या आईवडिलांसोबत , मित्रमैत्रिणींसोबत, लहान मुलांसोबत गप्पा मारा.
या सहा गोष्टी फक्त किमान ८ दिवस करून बघा.
तुमचं आयुष्य नक्की बदलेल आणि जर नाही  बदललं तर...

 कधीही whatsapp, Facebook, instagram , youtube  वर message करा

 आपलाच जिवलग मित्र



टिप्पण्या

  1. आपले विचार नेहमी सकारात्मक आणि सर्जनशील असावे. यातून नैराश्य येणार नाही. तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे आपल्या आवडी आणि छंद जोपासणे फार गरजेचे आहे. कशाचाही विचार न करता अगदी स्वच्छंदी जगलं पाहिजे. यातून जीवन खूप सुंदर होईल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Lockdown .. आणि लहाण मुले

विद्यार्थी आणि परीक्षा

कोरोणा,पोलिस आणि सध्यपरिस्थिती