विद्यार्थी, परीक्षा आणि सुप्रीम कोर्ट
मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांना परीक्षा घेणे बंधनकारक झाले. भलेही तुम्ही परीक्षा पुढे ढकला, पण परीक्षा ही घ्यावीच लागणार.
माझ्या मते तरी हा निर्णय विद्यार्थी हिताचाच आहे आणि मी याचं स्वागत करतो.
कारण कोरोना हे कारण पुढे करून अभ्यासू होतकरू विद्यार्थ्यांना व अभ्यास न करता परीक्षेला टाईमपास मानणाऱ्या मुलांना , एकाच रांगेत बसून सर्वांना पास करणं हे नक्कीच चुकीचं आहे.
सर्व प्रकारच्या उपायोजना करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हेच संयुक्तिक ठरेल.
पुढील निर्णय येण्याची वाट बघू तोपर्यंत तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली हरवलेली पुस्तके, नोट्स गोळा करायला लागा आणि अभ्यास सुरु करा.
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया धन्यवाद.
तुमचेही काही मत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि आपल्या विचारांना वाट मोकळी करून द्या.
👌👍
उत्तर द्याहटवा👍👌
उत्तर द्याहटवा